संत गजानन महाराज पालखी मार्गावरील वाहतुनियमन

 





 सोलापूर - ज्या अर्थी उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग सोलापूर यांनी त्यांचेकडील पत्र जावक क्रं 3246 /2025 दिनांक 19 जून 2025 अन्वये श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव येथुन श्री ची पालखी पायी पंढरपूर येथे प्रत्येक आषाढीवारीसाठी येत असते. सदर पालखी ही सोलापूर तालुका पोलीस ठाणे हददीतील धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून दिनांक 28जून 2025रोजी 03.00  वाजणेच्या सुमारास धाराशिव जिल्हयातून सोलापूर जिल्हयात प्रवेश करून उळेगाव येथे मुक्कामास असते, दिनांक 29 जून 2025 रोजी पहाटे 05.00 वा.चे दरम्यान पालखी उळेगाव येथुन प्रस्थान करून सोलापूर शहरात जाते व तेथे पालखी दोन दिवस मुक्कामी असते. दिनांक 01 जुलै 2025 रोजी पालखी सोलापूर येथुन प्रस्थान करून सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील ति-हे या गावी मुक्कामी असते. त्यांनतर दिनांक 02 जुलै 2025 रोजी पुढे प्रस्थान होवून पालखी माचणूर येथे मुक्कामी असते. तर दिनांक 03 जुलै 2025 रोजी पालखी माचणूर येथून प्रस्थान होवून पुढे मंगळवेढा येथे मुक्कामी असते. सदर पालखी सोहळयामध्ये पालखी सोबत पायी जाणारे वारकरी व वाहने असतात. तसेच श्रींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आजुबाजुच्या गावातील लोक मोठ्या प्रमाणात येत असतात. अशातच या महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने पालखी सोहळा हददीतुन पुढे घेवुन जाणे अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यामुळे सदर पालखी मार्गावरील वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे.






तथापी संत गजानन महाराज पालखीचे लहान स्वरूप, पालखी सोहळयामधील सहभागी होणा-या भाविकांची शिस्त तसेच पालखी ज्या मार्गावरून जाते (सोलापूर-तुळजापूर, सोलापूर-मंगळवेढा) हे मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने चौपदरी असल्याने सदरचे महामार्ग वाहतुकीकरीता पुर्ण बंद करणे उचित होणार नसल्याने आम्ही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.) व पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी (भा.पो.से.), सोलापूर ग्रामीण महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) अन्वये संत गजानन महाराज पालखी मार्गावरील वाहतूक नियमनाबाबत संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पालखी मार्गावरील वाहतुकीचे नियमन करणेबाबत खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.





 पालखी सोहळा व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी श्री. संत गजानन महाराज पालखी व पायी चालत जाणारे वारकरी ज्या मार्गावरून जसजसे पुढे येत जातील, फक्त त्याच मार्गावरील वाहतुक (पालखी जात असलेल्या मार्गिकेमधून जाणारी वाहतुक) त्या भागापुरती टप्प्या टप्याने बंद करून त्या - त्या भागापुरती वाहतुक रस्त्यावरील दुसरे बाजूचे मार्गिकेमधून (लेनने) वळविण्यात यावी.





 सदरच्या पालखी महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी बॅरीकेटींग करून पुरेशा प्रमाणात बंदोबस्त नेमून सदर पालखी सोहळयात कोणत्याही प्रकारची वाहने आडवी येणार नाहीत याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.


 




असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.), पोलीस अधीक्षक सोलापुर ग्रामीण अतुल वि. कुलकर्णी (भा.पो.से.) यांनी दिला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या