Swarajya News Marathi : सामाजिक

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot
Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Thursday, May 1, 2025

अक्का महादेवी- अल्लमप्रभू यांच्या संवादाच्या १०० व्या रूपक प्रयोग सदाबहार संपन्न

May 01, 2025 0

 



सोलापूर-  महात्मा बसवेश्वर महामंडळ, विजापूर रोड आणि जागतिक लिंगायत महासभा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने   ओम गर्जना चौक,सवेरा नगर सैफुल येथे बसव जयंतीनिमित्त आयोजित एका विशेष व्याख्यान आणि जीवनगौरव -सन्मान समारंभाचे प्रथम श्रेणीचे सरकारी कंत्राटदार परमानंद अलगोंडा पाटील यांनी बसवण्णाच्या प्रतिमेला प्रार्थना करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. जागतिक लिंगायत महासभेचे राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. 






व्यासपीठावर माजी आमदार शिवशरण पाटील, डॉ. शरणबसव हिरेमठ, शिक्षक नेते सूर्यकांत भरले व वीरभद्र यादवाड , शासकीय कंत्राटदार रेवणसिद्ध बिज्जरगी, चन्नबसप्पा गुरुभेट्टी, जागतिक लिंगायत महासभाचे अध्यक्ष शिवानंद गोगाव ,माजी विस्तार शिक्षणधिकारी अशोक भांजे,  सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण चलगेरी, नामदेव फुलारी, महिला अध्यक्षा राजेश्री थलंगे,आदी उपस्थित होते.              







शंकरलिंग महिला मंडळ आणि जागतिक लिंगायत महासभेच्या महिला सदस्यांनी सादर केलेल्या 'अनुभव मंडपा'मधील अक्का महादेवी- अल्लमप्रभू यांच्या संवादाच्या १०० व्या रूपक प्रयोग ने लक्ष वेधून घेतले.माता अक्का महादेवी यांची भूमिका राजश्री थंळगे यांनी साकारली. महानयोगी अल्लमप्रभू, शिवयोगी सिद्धारमेश्वर ची भूमिकासह 40 महिला कलाकारांनी ने अप्रतिम अभिनय सादर केले. व उपस्थिताचे मने जिकंली.            






व्याख्यानाचे पहिले पुष्प 'बसवण्णांच्या विचारांमधून सामाजिक एकता' या विषयावर व्याख्यान गुमफतांना आज सर्वत्र अशांतता आहे. घरे आणि मनं दुःखाची कुंडं बनत चालली आहेत. मुले संस्कृतीपासून दूर जात आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकाने आपल्या जीवनात शरण संस्कृती अंगीकारण्याची गरज आहे. त्यामुळे आजच्या मुलांना बसवण्णा आणि शरणं यांचे वचन व त्यांचा अर्थ शिकवला तर ते आयुष्यात कधीही भरकटणार नाहीत, असे लातूरचे डॉ. भीमराव पाटील यांनी सांगितले. आजची मुले आणि तरुण शहाणे आहेत. ते म्हणाले की, ते शिक्षणाचे कोणतेही क्षेत्र असो, ते वैद्यकीय असो किंवा अभियांत्रिकी, जर त्यांना व्यावसायिक शिक्षणासोबतच शरणची तत्वे आणि वचने शिकवले तर ते आयुष्यात यशस्वी होतील. 






दुसरे पुष्प व्याख्याते डॉ. बी. बी. पुजारी यांनी "सांस्कृतिक नायक बसवण्णा" यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, बसवण्णा हे जगातील एक महान तत्वज्ञानी होते. ते फक्त एका राज्याचे सांस्कृतिक नायक नाहीत. संपूर्ण विश्वाचे नायक आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार समजून घेणे आणि ते आज आपल्या जीवनात लागू करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.






कार्यक्रमास दासोह केलेले बसवेश्वर हॉटेलचे मालक चन्नाबसप्पा गुरुभेट्टी आणि जयश्री गुरुभेट्टी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खसगी, सचिव नागेंद्र कोगनुरे,  युवक अध्यक्ष शिवराज कोटगी, अक्कलकोट तालुकाध्यक्ष सचिन कालीबत्ती, सोलापूर अध्यक्ष डॉ.बसवराज नांदर्गी, शशिकला रामपुरे, उ.सोलापूर अध्यक्ष उमेश कल्याणी, वागदरी अध्यक्ष शरणप्पा मंगाणे , बसवराज आलुरे आदी उपस्थितीत होते. 







कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र हौदे, राजशेखर लोकापुरे आदींनी परिश्रम घेतले. मीनाक्षी बागलकोट आणि मीनाक्षी थलंगे  वचन गायले. अध्यक्ष शिवानंद गोगाव यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रास्ताविक केले. शिक्षक सुरेश पीरगोंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. तर रमेश येणेगुरे आभार मानले.






या मान्यवरांचे जीवन गौरव सत्कार 

सिद्धराम गुरुभेट्टी, परमानंद अलगोंडा, शिवानंद भरले, अमर पाटील, काशिनाथ भतकुनकी, तुकाराम कुदळे, शिवलीला गुड्डोदगी, इंदुमती हिरेमठ, भाग्यश्री सोडगी, गुरुबाळ बगले, संतोष हरकरे. मान्यवरांनी त्यांना बसवांची मूर्ती आणि विभूती भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

Read More

Wednesday, April 30, 2025

गोमय मूल्यवर्धित उत्पादन विक्री दिवसा निमित्त स्टॉलचे उदघाटन

April 30, 2025 0



सोलापूर - 30 एप्रिल 2025 हा दिवस राज्यात गोमय उत्पादन विक्री दिवस साजरा करावयाचा आहे. यामध्ये  पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने गोमय मुल्यवर्धित उत्पादन विक्री दिवस आदर्श कामधेनु संशोधन संस्था संचलित कट्टेव्वादेवी गोशाळेचे गोमय उत्पादन विक्री  स्टॉलचे उद्घाटन समारंभ  मा. आमदार सुभाष देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, यावेळी केतनभाई शहा (भारतीय जैन संघटना राज्य अध्यक्ष), गोशाळेचे अध्यक्ष उमा बिराजदार, रुद्रप्पा बिराजदार, केमचे श्री परमेश्वर तळेकर ,येवले, (सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त) ह.भ.प. अभिमन्यू डोंगरे महाराज जिल्हाध्यक्ष  विश्व हिंदू परिषद, सोलापूर.) महेश भंडारी, (अध्यक्ष, सोलापूर गोसेवा महासंघ) यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. 






या वेळी गोभक्त, गोसेवक, गोरक्षक उपस्थित राहून गोमातेच्या गोशाळांनी सहभाग नोंदवला नजीकच्या एसटी बस स्थानकावर दिनांक 30.04.2025 रोजी पूर्ण दिवसभर त्यांच्याकडील गोमय उत्पादनाचा (स्टॉल) लावायचा आहे. त्याची प्रसिद्धी व विक्री करून उत्पादने किती चांगली आहे याबाबत स्थानकावर आलेल्या प्रवाश्यांना सविस्तर माहिती द्यावयाची आहे. सदर बाब केल्याने गोमय उत्पादनांची उत्कृष्ट अशी प्रसिद्धी होईल व गोशाळेला अर्थाजन होण्यास मदत होईल व त्या मुळे भाकड गोवंश हे कत्तलखान्या मध्ये जाणार नाहीत,तसेच शेतकरी सुद्धा आपले गोवंश हे कसाईना विकणार नाही,,

Read More

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त जी.एम संस्थे तर्फे सामुदायिक बुद्ध वंदन घेऊन अभिवादन

April 30, 2025 0

 



 सोलापूर - जगत ज्योती समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महात्मा बसवेश्वर चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास जी.एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जी.एम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख व सामाजिक कार्यकर्ते जी.एम संस्थेचे सल्लागार राजाभाऊ हौशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन दीप प्रज्वलित करून समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. 







या प्रसंगी बोलताना जी.एम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड म्हणाले की  12व्या शतकातील, महान संत, जगदज्योति, समतानायक, महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंटप नावाचे व्यासपीठ तयार करून या व्यासपीठाच्या साह्याने  कर्मकांडाच्या मगरमिठीतून धर्माची मुक्तता करण्यासाठी तसेच त्याला व्यवहारिक  व लोकशाही विश्वधर्माचे स्वरूप देण्यासाठी महान ऐतिहासिक कार्य महात्मा बसवेश्वरांनी केलं  त्या काळी धार्मिक, सामाजिक, आर्थिक जीवनात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली त्याचप्रमाणे जातीभेद व अनिष्ट रूडी परंपरेला कडाडून विरोध केला 





आशा हया महान समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्त जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था  संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीने तमाम भारतीयांना शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते जीएम संस्थेचे मार्गदर्शक राजाभाऊ हौशेट्टी जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड दत्ता शिंदे आप्पासाहेब गायकवाड नरेंद्र शिंदे कुंदन वाघमारे नरेश कदम अजय कोळेकर मॅडी दुपारगुडे यशपाल कांबळे निहाल क्षीरसागर नंदकुमार चंदनशिवे आदी पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.




जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख जीएम संस्थेचे मार्गदर्शक राजाभाऊ हौशेट्टी शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड दत्ता शिंदे आदी.

Read More

रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आमरस व पुरणपोळीचा मिष्टान्न भोजन

April 30, 2025 0





सोलापूर : आस्था रोटी बँकेने अक्षय तृतीयानिमित्त सोलापूर शहरात माणुसकीचा सुवास पसरविणारे विविध कार्यक्रम आयोजित केले. प्रारंभी भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे रामचंद्र तडवळकर, डॉ जानवी माखीजा, लक्ष्मीकांत बिराजदार यांची उपस्थिती होती.




तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खास आमरस आणि पुरणपोळीच्या मिष्टान्न भोजनाची मेजवानी उभारली गेली. रुग्णांच्या तणावग्रस्त चेहऱ्यांवर समाधानाचा हास्यफुलारा फुलला. "सणाच्या दिवशी घरापासून दूर असूनही, इथे घरचीच ऊब मिळाली," अशा भावना व्यक्त करत भावुक नातेवाईकांनी फाऊंडेशनचे आभार मानले.






या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात, कुमठा नाका रोडवरील भारतमाता नगरीत राहणाऱ्या महिला कुष्ठरोगी वर्गासाठीही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वादिष्ट मिष्टान्न भोजनानंतर, अध्यात्मिक आधार देणाऱ्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन झाले. गवळी वस्तीतले ह. भ. प. अरुंधती महाराज भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय साध्या, रोजच्या जीवनातील उदाहरणांनी स्फुर्ती देणारे कीर्तन सादर केले.





समाजाकडून दूर लोटलेल्या या महिलांना आजवर टीव्हीवरच पाहिलेल्या कीर्तनाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. मंदिरात जाऊन कीर्तन ऐकण्याची इच्छा असूनही शारीरिक व्यंगांमुळे त्यांना हे शक्य झाले नव्हते. मात्र आज, त्यांच्या गुमनाम दुनियेत आनंदाचा दीप उजळला. डोळ्यांत पाणी, ओठांवर हसू आणि मनात कृतज्ञता — असा अनोखा सोहळा या महिलांनी अनुभवला.






आस्था फाऊंडेशनने केलेल्या या उपक्रमांमुळे समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत प्रेमाचा, स्नेहाचा आणि आस्थेचा हात पोहचविला.




कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विजय छंचुरे, नीलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, स्नेहा वनकुद्रे, संपदा जोशी, अनिता तालीकोटी, राधा मॅडम, मंगल पांढरे, अविनाश मार्चला, या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी केले. 




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे केले, तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे यांनी केले.

Read More

पठाण परिवाराकडून लक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण शुभारंभ

April 30, 2025 0



सोलापूर - इंगळे वस्ती निलम नगर येथील आशा मराठी विद्यालय आणि श्री धर्मण्णा सादूल प्रशालेच्या क्रिडागंण समोरील जागेत पुरातन काळापासून लक्ष्मी मंदिर आहे. याला अवकळा आली होती. शिक्षण समूहाचे संस्थापक हारुण पठाण परिवाराच्या वतीने या मंदिर परिसराचे सुशोभीकरण स्व: खर्चाने करण्यात येणार आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर  भूमीपुजन सौ व श्री विष्णू इंगळे सौ व श्री जगदिश मुसळे सौ व श्री भिमा कोरे सौ व श्री चिदानंद निंबाळ या दाम्पत्यांच्या शुभ हस्ते देवीस खणा नारळाची ओटी भरली आणि भूमिपूजन करण्यात आले. तसेच थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले.

        




या प्रसंगी आशा मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तस्लिमबानो पठाण, श्री धर्मण्णा सादूल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ आफरिन सय्यद मराठा सेवा संघाचे राम गायकवाड आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






पठाण परिवाराकडून हिंदू मंदिर परिसराचे सुशोभीकरण हे बंधुभाव जपणार कार्य आहे. यामुळे धार्मिक एकोपा वाढीस लागेल. श्रध्दास्थान सुशोभीकरण केल्याने एक आत्मिक समाधान मिळेल असे मत हारुण पठाण यांनी व्यक्त केले.





पठाण परिवाराच्या वतीने या पुर्वी ही मातंगी मंदिरा साठी जागा उपलब्ध करून देऊन मंदिराच जिर्णोध्दार केले होते. निलम नगर परिसरातील शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमीच सहकार्याची भूमिका असते.

Read More

Tuesday, April 29, 2025

ग्रामदैवत हनुमान यात्रा डॉल्बी मुक्त वातावरणात साजरी

April 29, 2025 0

  



सोलापूर - तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील मौजे तळेहिप्परगा या गावातील ग्रामदैवत हनुमानाची यात्रा दिनांक 25.04.2025 रोजी होती. सदर यात्रेच्या अनुषंगाने दिनांक 24.04.2025 रोजी गावात किर्तन, भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

       





मौजे तळेहिप्परगा येथील ग्रामदैवत हनुमान देवाच्या यात्रेची मिरवणुक पोलीस प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन डॉल्बीचा वापर न करता पांरपांरीक पध्दतीचे वाद्य वापर करून मिरवणुक काढणे बाबत तळेहिप्परगा येथील यात्रा पंच कमिटी यांनी व गावातील ग्रामस्थ यांनी निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे हनुमान देवाची मिरवणुक पांरपारीक पध्दतीच्या वाद्य वापर करून मिरवणुक शांततेत व वेळेत पार पाडली आहे.

      






मौजे तळेहिप्परगा येथील हनुमान यात्रेचा काठीचा मान हा मुस्लीम समाजातील उस्मान शेख याचेकडे तळेहिप्परगा गाव अस्तित्वात झाले पासुन आहे. उस्मान शेख हे नाशिक येथे फरशीच्या दुकानात काम करतात. यात्रे करीता ते नाशिक येथुन एक महिन्या पासुन तळेहिप्परगा येथे थांबुन त्यांनी हनुमानाची काठी सजवुन एकात्मेचे उत्तम उदाहरण घडवुन दिले आहे. सदर यात्रे करीता रतिकांत पाटील, छावा संघटना उत्तर सोलापूर व पंच कमीटी, तळेहिप्परगा याचे सहकार्य लाभले आहे.

       






यात्रा कमिटी मधील सदस्य (1) विट्ठल रेवजे (2) उस्मान शेख (3) तानाजी सुरवसे (4) अभिजित पाटील (5) सुमित सावंत व (6) शशिकांत स्वामी या सर्वांचा दिपक चव्हाण, अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर व पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी सोलापूर तालुका, पोलीस ठाणे येथे डॉल्बीमुक्त मिरवणुक पार पाडल्याबद्दल त्यांचा वृक्ष देऊन सत्कार करून त्यांना भविष्यात अशाच प्रकारे उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

       





सणोत्सवा दरम्यान कर्णर्र्कश्य डॉल्बीचा वापर करून हदयरोग, बहिरेपणा, उच्चरक्तदाब या सारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देणा-या मिरवणुका काढणा-या तरूणाईसाठी हा आदर्श घालुन दिला आहे. अशाच मिरवणुका व समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन दिपक चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी केले आहे.  

       





सदर यात्रे मध्ये कोणताही अनुचित प्रकार न घडता मिरवणुक शांततेत पार पाडावी या अनुषंगाने मा. श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर, दिपक चव्हाण पोलीस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर याचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे यांचे नेतृत्वाखाली पोसई/घोडके, सपोफौ/ बानेवाले, पोहवा/नागेश कोणदे व मनोज भंडारी यांनी चोख बंदोबस्त केला आहे. 

Read More

बसवेश्वर जयंती मंगळवेढा येथे शासनस्तरावर भव्य स्वरूपात साजरी करण्यात यावे

April 29, 2025 0


                           


मुंबई - समता, मानवता आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक असलेले महात्मा बसवेश्वर यांची जयंती दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी साजरी होणार आहे. मंगळवेढा हे त्यांचे कर्मभूमी असून, त्यांनी येथे सलग बारा वर्षांहून अधिक काळ वास्तव्य करून समतेचा व लोकशाहीचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. या ठिकाणी त्यांची जयंती शासनामार्फत भव्य व शासकीय स्वरूपात साजरी होणे अत्यंत आवश्यक आहे.महाराष्ट्र शासनाने २००१ पासून महात्मा बसवेश्वर यांचा महापुरुषांमध्ये समावेश केल्याने सर्व शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते. तसेच, शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक १८ जानेवारी २०२३ च्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक संस्थांमध्ये जयंती साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.                    






मंगळवेढा येथील समता भूमी (राष्ट्रीय स्मारक) येथे हा उत्सव व्यापक स्वरूपात व भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.या अनुषंगाने, महात्मा बसवेश्वर जयंती २०२५ मंगळवेढा येथे भव्य स्वरूपात साजरी यावे अशी मागणी जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी मुंबई येथील टिळक भवन या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे मागणी केली असता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच माजी मंत्री जन स्वराज्य पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे (सावकार) व सोलापूर लोकसभाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा शासनाकडे मागणी केली आहे.                              





यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे म्हणाले  शासकीय उपक्रमामुळे लिंगायत समाजाच्या भावनांचा सन्मान होईल, सामाजिक ऐक्य बळकट होईल आणि महात्मा बसवेश्वर यांच्या समतावादी विचारांचा प्रसार होईल. तसेच, मंगळवेढा येथील समता भूमीचे राष्ट्रीय स्मारक म्हणून महत्त्व अधोरेखित होईल.आपण याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन प्रस्तावित कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निर्देश द्याल, अशी अपेक्षा व्यक्त केले आहे.                          





जागतिक लिंगायत महासभेचे वतीने प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव व मंगळवेढा तालुका अध्यक्ष अमोल म्हमाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read More

Monday, April 28, 2025

पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटना अध्यक्षपदी सिद्धाराम मोटे

April 28, 2025 0


सोलापूर - पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटना भवानी पेठ मड्डी वस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी नियोजन बैठक आयोजित करण्यात आले होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मिटिंग प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. 






यावेळी भाजपा चे माजी नगरसेवक तथा सभागृह नेते सुरेश पाटील, संघटनेचे संस्थापक अर्जुन पांढरे, संघटनेचे अध्यक्ष हनुमंत रुपनर, जगदेव बंडगर, बसवराज रुपनर, सुभाष सोनकर, धरेप्पा मोटे, सुरेश काले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भैय्या सरवदे, गुरु कावडे, अशोक कोळेकर, शंकर बंडगर, लक्ष्मण विटकर, सिद्ध निशाणदार, अभिषेक भाईकट्टी, यशवंत सलगर, अवी भोळे आदींची उपस्थिती होती. 

        





याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आले. पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटना, भवानी पेठ, मड्डी वस्ती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती यंदाच्या त्रिशताब्दी वर्ष आणि संघटनेचे सुवर्ण वर्ष असल्याने जयंती मोठ्या उत्साहाने करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

       






यावेळी माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी म्हणाले की, मी आज पर्यंत जे काही नाव कमवले ते फक्त अहिल्यादेवी हीतवर्तक संघटना मुळेच कमवले आहे. त्यासोबतच अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या परिक्रमाची माहिती दिले.

           





या बैठकीत संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. उत्सव अध्यक्ष सिद्धाराम मोटे, उपाध्यक्ष ओमकार भिसे, आनंद इंरडगी, कार्याध्यक्ष उमेश वायकोळे खजिनदार सचिन सोनकर, सह खजिनदार प्रकाश दहिवडे, सेक्रेटरी काशीराम मोठे, सहसेक्रेटरी अमोल बंडगर, पूजा प्रमुख हनुमंत वडरे, रेवण मोठे, सोशल मीडिया प्रमुख समर्थ बनणे, स्वप्निल मोठे, शिवराज केलुरे, मिरवणूक प्रमुख राम खांडेकर, शुभम दुधाने, रवी सलगर, कुमार नागराळे, अनिल तळेकर सचिन बंडगर, सचिव सतीश वडनूर, सहसचिव गणेश बंडगर, सुवर्ण महोत्सव सल्लागार समिती दत्ता पांढरे, महेश ठोंबरे, रंगनाथ हक्के, माळप्पा रेल्वे, यल्लाप्पा पुजारी सांस्कृतिक विभाग प्रमुख सुरेश काळे, अजय रुपनर आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आले.

Read More

रस्त्यावर राहणाऱ्या कुत्र्यांना Reflective Belts चे वाटप... प्राण्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

April 28, 2025 0




सोलापूर – स्वराज संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेला "दीपबंधन" उपक्रम सोलापूर शहरातील प्राणिमित्रांच्या मनाचा ठाव घेत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर फिरणाऱ्या कुत्र्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी Reflective Belts लावण्याचा हा उपक्रम आहे.






"दीपबंधन" हे केवळ एका उपक्रमाचे नाव नाही, तर माणसाचा मुक्या जीवांशी जोडलेल्या प्रेमाच्या आणि जबाबदारीच्या नात्याचे प्रतीक आहे.  






वाहनांच्या प्रकाशात चमकणारे हे Reflective Belts रात्रीच्या वेळी कुत्रे सहज दिसण्यास मदत करतात आणि त्यांच्यावर तसेच वाहनचालकांवर होणाऱ्या अपघातांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी करतात.






"आपण जसे आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, तसेच या मुक्या जीवांचीही आपलेपणाने काळजी घ्यायला हवी," असे मत स्वराज संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा स्वराली सुधा रविंद्र भोसले यांनी व्यक्त केले.






या उपक्रमात स्वराज संस्थेच्या सदस्यांनी मिळून एकूण १३० Reflective Belts कुत्र्यांना लावले, ज्यामुळे रस्त्यांवरील त्यांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडली आहे.






सोलापूरकरांकडून या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत असून, "दीपबंधन" हे शहरातील सकारात्मक बदलाचे प्रतीक ठरत आहे, जिथे प्रेम, जबाबदारी आणि करुणा यांचा सुंदर संगम आहे.






उपक्रमात सहभागी सदस्य:  स्वराली सुधा रविंद्र भोसले, निरंजन कुलकर्णी, व्यंकटेश इटेकर, दिपा नारायणकर, ऋतुजा कमले, मयूरेश गवळी, अर्णव कुलकर्णी, दिपक पांडे, महेश प्रधाने, पार्थ भोसले, आकाश कोठाडिया, मनिष परदेशी, मयुर बनसोडे, चैतन्य शेटे, आदिती भोसले, मुद्दिता वाघमारे, श्रद्धा गाडेकर, दिपा स्वामी, कुणाल जैन, श्रेयस राऊत, प्रथमेश ओहोळ, अभिषेक कुलकर्णी, उत्कर्ष उंबरजे, मनस्वी, आकांक्षा, राहुल इत्यादी.

Read More

Saturday, April 26, 2025

छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाने दिले आयुक्तांना निवेदन

April 26, 2025 0





सोलापूर - शिवपुत्र छत्रपती सांभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ च्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांचा सत्कार करण्यात आला आणि जयंती निमित्त विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.





१४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असून ११ मे पर्यंत छत्रपती संभाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्या परिसरात भव्य मंडप मारण्यात यावे. संपूर्ण परिसरात LED लाईट आणि फोकस लावण्यात यावेत.






छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्या परिसर फुलाने सजावट करण्यात यावे अशी मागणी मध्यवर्ती महामंडळ संस्थापकअध्यक्ष राम जाधव आणि उत्सव अध्यक्ष निशांत सावळे यांनी केली. तत्काळ आयुक्त ओम्बासे यांनी निवेदनाची दखल घेऊन अधिकाऱ्यांना काम करून घेण्यास सूचना दिल्या.





यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उत्सव कार्याध्यक्ष विरेश कलशेट्टी, उपाध्यक्ष सॅम पतंगे, विश्वस्त पवन आलुरे, राजाभाऊ गेजगे, हरीभाऊ सावंत, संदीप चेळेकर आदी जण उपस्थित होते

Read More

Friday, April 25, 2025

सोलापूरातील विविध प्रश्न मार्गी लावा... पालकमंत्र्याकडे मागणी

April 25, 2025 0

 




सोलापूर - सोलापूर शहरातील अनेक विविध प्रश्न राजकीय अनास्था मुळे व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे करोड रुपये खर्च करून अनेक कामांची दुरवस्था झालेली असून  सर्वसामान्य जनतेचे करोडो रुपये  वाया गेलेले दिसून येत आहे त्यामुळे आपण जातीने लक्ष घालून महानगरपालिका प्रशासन व अधिकाऱ्यांना समज देण्यात यावी व सोलापुरातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतः जातीने लक्ष द्यावे असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भेटून देण्यात आले 

 





सोलापूर शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण केंद्र गेल्या पाच सहा वर्षांपासून बंद आहे त्यामुळे अनेक जलतरुपटूंची गैरसोय होत आहे फक्त वीस-पंचवीस लाखांमध्ये हा आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव दुरुस्त होऊ शकतो पण जिल्हा क्रीडा अधिकारी मनावर घेत नाहीत त्यांना याबाबत समज देण्यात यावी. 


2) सोलापूर शहरातील करोड रुपये खर्चून एडवेंचर पार्क सिद्धेश्वर मंदिरातील लेझर शो तसेच सोलापूर शहरातील सर्व उद्याने बंद आहेत तसेच सोलापुरातील प्राणी संग्रहालय सुद्धा बंद आहे याबाबत महानगरपालिका प्रशासनास याबाबत समज देण्यात यावी. 

3) जुळे सोलापूर भागातील  आसरा रेल्वे पूल रुंदीकरणाचे काम 2022 पासून नितीन गडकरी साहेबांनी निधी देऊन सुद्धा जल वहिनी काढण्यासाठी तीन वर्षापासून प्रलंबित आहे याबाबत सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना आदेश देण्यात यावे.

4) सोलापूर विमानसेवा तातडीने सुरू करण्यात यावी सोलापूर विमान तळास छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्यात यावे .

5) उजनी समांतर जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावेत तसेच सोलापूर शहरात उजनी धरणातून पाणीपुरवठा केला जातो पण सोलापूर महानगरपालिकेचे वतीने जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये व्यवस्थित जल शुद्धीकरण केले जात नाही काही मशनेरी बंद आहेत त्यामुळे दूषित पाणीपुरवठ्यामुळे सोलापुरात अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत याबाबत शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यास आदेश द्यावेत.

6) छत्रपती शिवाजी महाराज सर्वपचार रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन अनेक दिवसापासून बंद आहे सिटीस्कॅन मशीन सोलापुरा उपलब्ध होऊन सुद्धा अद्याप ती यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही ते तातडीने सुरू करण्याचे आदेश अधिष्ठाता यांना देण्यात यावे.

7) सोलापूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने अतिक्रमण संबंधित अतिक्रमण काढण्यासाठी माननीय आयुक्त साहेब यांना आदेश व्हावेत.

8)सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धारमेश्वर यांच्या प्रवेशद्वाराजवळ सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलेल्या आहे ते शौचालय तिथून हटवून इतर जागी हलवावेत ही तमाम सोलापूरकर वासियांची भावना असून त्या भावनेचा आदर राखून तेथील शौचालय बंद करण्यात यावे

9) शासनाच्या विविध योजनांसाठी बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांनी तातडीने सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन शासकीय योजनेसाठी कर्ज देण्यासाठी बँकेला आदेश द्यावेत.

10) सोलापूर शहरांमध्ये मोठे उद्योगधंदे येण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न व्हावा .

11) काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपलेला आहे पावसाळ्याची शक्यता गृहीत धरून सोलापूर शहरातील सर्व नालेसफाई चे कामे तातडीने करण्यात यावेत यासाठी निधी  मंजूर करावा. 

सोलापुरातील बंद पडलेली परिवहन सेवा पुनश्च तातडीने सुरू करण्याची यावी. या मागण्या निवेदनात करण्यात आल्या. 





यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे शहर सचिव सिद्धाराम साबळे शहर संघटक शेखर कंकर जिल्हा संघटक दिलीप निंबाळकर शहर संघटक राजशेखर स्वामी आधी उपस्थित होते

Read More

Thursday, April 24, 2025

छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी निशांत सावळे

April 24, 2025 0



सोलापूर - शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी निशांत सावळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शिवपुत्र संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष राम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मुरारजी पेठ येथील हिंदवी स्वराज्य भवनात मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जयघोष करून बैठकीला सुरुवात करण्यात आली.

    





१४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. या निमित्ताने मध्यवर्ती महामंडळाच्या अधिपत्याखाली मिरवणुका निघणार आहेत .सोलापूर शहरातील मंडळांना येणाऱ्या अडचणी संदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली. पारंपारिक वाद्य आणि डॉल्बी संदर्भात प्रशासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. मंडळाला येणाऱ्या अडचणी संदर्भात संपर्क साधण्याचे आवाहन शिवपुत्र संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष राम जाधव यांनी केले आहे.

  





अठरापगड जातींना सोबत घेऊन सोलापुरात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे .या माध्यमातून संभाजी महाराजांचे कर्तृत्व आणि विचार पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सोलापुरातील मंडळांनी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करताना संभाजी महाराजांच्या इतिहासाला चित्र आणि देखाव्याच्या माध्यमातून प्राधान्य द्यावे ,असे आवाहन नूतन उत्सव अध्यक्ष निशांत सावळे यांनी केले आहे.

 




उत्सव अध्यक्षपदी निशांत सावळे, कार्याध्यक्षपदी वीरेश कलशेट्टी आणि उपाध्यक्षपदी सागर गायकवाड आणि सॅम पतंगे यांची निवड करण्यात आली.

  




यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त राजाभाऊ गेजगे, पवन आलुरे, हरिभाऊ सावंत, नागेश भोसले आणि राहुल दहीहंडे उपस्थित होते.

Read More

Wednesday, April 23, 2025

अंकोलीच्या श्री भैरवनाथाचा यात्रा महोत्सव उत्साहात साजरा... भैरवनाथाच्या नावानं चांगभलं चा जयघोष

April 23, 2025 0

 



सोलापूर - हजारो भक्तगणांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र अंकोली भैरवनाथ यात्रा (ता. मोहोळ) उत्सव मोठ्या भक्तीमय व धार्मिक वातावरणा पार पडला. 20 ते 23 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या यात्रास उत्सवा देवाचा विवाह सोहळा, कावडींसह पालखी, छबिना व शोभेचे दारूकाम असे कार्यक्रम झाले असल्याचे मंदीर समितीच्यावतीने सांगण्यात आले.






श्री क्षेत्र अंकोली भैरवनाथ हे सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील हजारों भक्तगणांचे कुलदैवत आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात श्री भैरवनाथ यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाच्यावर्षी हा यात्रा उत्सव 20 ते 23 एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात आला. श्री क्षेत्र अंकोली भैरवनाथ यात्रेत 20 एप्रिल रोजी रात्री 10 पासून पहाटे 5 वाजेपर्यंत श्री जागर होऊन पहाटे 5 वाजता श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळ्यातील अक्षदा पार पडल्ाय. त्यानंतर महाआरती झाली. 








21 एप्रिल रोजी सोमवारी गावकऱ्यांची अष्टमी दिवशी नाल बसवणे तसेच दुपारी 4 वाजता मानाच्या कावडींसह आरत्या निघाल्या. रात्री सवाद्य पालखी छबिना निघाला. 21, 22 आणि 23 एप्रिल या तिन्ही दिवशी पालखी छबिना निघाला. यावेळी यात्रेसाठी आलेल्या हजारो भक्तगाणांनी पालखीला खांदा देत कावडी नाचविल्या. बुधवारी 23 एप्रिल रोजी पालखी छबिना सोहळ्यात शोभेचे दारूकाम होऊन यात्रेचा समारोप झाला. या यात्रा उत्सवासाठी मंदीर समिती तसेच गावकऱ्यांकडून येणाऱ्या भक्तगणांच्या सोयी-सुविधांसाठी परिश्रम घेण्यात आले.

Read More

Sunday, April 20, 2025

भारताच्या संविधानात वक्फ हा शब्दच नाही

April 20, 2025 0

 



सोलापूर : ज्या वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्यावरून देशभरात प्रचंड चर्चा सुरू आहे, तो वक्फ शब्दच भारतीय संविधानात कुठेही लिहिलेला नाही असे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले. विकास सहकारी बँकेतर्फे रविवारी सकाळी शिवछत्रपती रंगभवन सभागृहात 'महान भारत' या विषयावर त्यांचे अभ्यासू व्याख्यान झाले.






प्रारंभी ॲड. अश्विनी उपाध्याय यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर बँकेचे चेअरमन कमलकिशोर राठी, बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष सी.ए. राजगोपाल मिणियार, व्हा. चेअरमन राजगोपाल चंडक, जनरल मॅनेजर सी. ए पी. एस. मंत्री उपस्थित होते.





ॲड. उपाध्याय म्हणाले, अयोध्या, काशी, मथुरा, संभल अशा अनेक प्रकरणात कागद मागणारे सर्वोच्च न्यायालय वक्फ प्रकरणात मात्र कागद कोठून आणणार असे म्हणत आहे. भारतात हिंदू बहुसंख्य आहेत. परंतु हिंदूंसोबत भेदभाव होत आहे. भारत हा जगात एकमेव देश असा आहे की जिथे बहुसंख्य लोक सर्वधर्मीयांना समान अधिकार द्या असे म्हणत आहेत. भारतातील चार लाख मठ आणि मंदिरांवर सरकारचे नियंत्रण आहे. परंतु एकाही मशीद आणि चर्चवर सरकारी नियंत्रण नाही, असेही ॲड. उपाध्याय यांनी सांगितले. 






७०० वर्षांच्या मोगलांच्या आणि १५० वर्षे इंग्रजांच्या गुलामीनंतर वक्फची ५० हजार एकर जमीन होती. परंतु स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांमध्ये यात तब्बल ८० पट वाढ होऊन ती ४० लाख एकर झाली. याला आक्षेप असल्याचे ॲड. उपाध्याय म्हणाले. वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्यासाठी संयुक्त संसदीय समिती, चर्चा मतदान ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर हा कायदा बनला आहे. मग या कायद्याला विरोध का होत आहे ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. लोकसंख्येचा विस्फोट हे भारतातील ५० टक्के समस्यांचे मूळ कारण आहे. जगाच्या तुलनेत भारताकडे दोन टक्के जमीन आहे. त्यानुसार भारताची लोकसंख्या १६ कोटी हवी. परंतु भारताची लोकसंख्या १५० कोटींच्या घरात आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्यविषयक समस्या, प्रदूषण वाढत आहे. भारतात या समस्यांवर चर्चा केली जाते. परंतु त्यावरील उपायांबाबत चर्चा आणि कृती होत नाही असेही ॲड. अश्विनी उपाध्याय यांनी याप्रसंगी सांगितले.






याप्रसंगी संचालक डॉ. नवनीत तोष्णीवाल, ओमप्रकाश तिवाडी, सुरेश बिटला, राजकुमार राठी, हरिनिवास जाजू ,मनीष बलदवा, सुरेश बिटला , राजेंद्र आसावा, ज्योती आसावा आधी उपस्थित होते.






बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष सी.ए. राजगोपाल मिणियार यांनी प्रास्ताविक केले. संचालिका अनुराधा चांडक यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

Read More

जयंती मिरवणुकीत "झोपाळ्यात माता रमाई - डॉ. आंबेडकर " लक्षवेधक देखावा

April 20, 2025 0





सोलापूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी. ग्रुप ) यांच्या वतीने  "झोपाळ्यात समाज हिताची चर्चा करताना माता रमाई - डॉ. आंबेडकर" तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यांचा भव्य देखावा सादर  करण्यात आला. 

        




या देखाव्यामध्ये हरणे बागडत असलेल्या सुंदर बागेत झोपाळ्यामध्ये एकमेकांशी समाज हिताची चर्चा करत असताना माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. प्रमुख मार्गदर्शक माजी गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली नेटक्या पद्धतीने ही मिरवणूक काढली. 

        





रविवारी सकाळी 12 वाजता या मिरवणुकीची सुरुवात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोराडे, उद्योजक इंदरमल जैन, धूत सारीजचे पुरुषोत्तम धूत, मंडळाचे मार्गदर्शक माजी गट नेते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी , बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सवाचे अध्यक्ष विकी शेंडगे, रॉकी बंगाळे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. दिमाखात ही मिरवणूक मार्गस्थ झाली. 







यावेळी पी. बी. ग्रुप प्रमुख गौतम चंदनशिवे, प्रतीक चंदनशिवे, उत्सव अध्यक्ष बाबा गायकवाड, कार्याध्यक्ष प्रथमेश सुरवसे, धीरज वाघमोडे, एस. के. फाउंडेशनचे संस्थापक रविकांत कोळेकर, उपाध्यक्ष महेश श्वाके, सचिव सिद्धांत तळभंडारे, खजिनदार रवी मॅतरोलु  ,श्रीमंत जाधव,  अॅड. विशाल मस्के आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

     





दरम्यान, यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मंडळाच्या देखाव्याचे कौतुक केले. सर्वांनी शिस्तबद्ध रित्या शांततेत मिरवणूक काढण्याचे आवाहन करताना शुभेच्छा दिल्या. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनीही सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.

   





आदर्श घेण्यासारखा देखावा : आनंद चंदनशिवे

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंडळाच्या वतीने शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली. डॉ. आंबेडकर हयात असताना पासून सोलापूर शहरात मिरवणुकीची परंपरा आहे. त्यामुळे आमच्या मंडळाने समाजाला आदर्श वाटेल असा देखावा सादर केला आहे. सर्व जाती - धर्माचे लोक या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने सहभागी होतात, असे यावेळी मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.

Read More

Thursday, April 17, 2025

14 मे पूर्वी 10 फुटी राजमुद्रा बसवण्यात येणार... विविध कामे ही होणार पूर्ण

April 17, 2025 0


सोलापूर - छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा कलर करणे, राजमुद्रा बसवणे, परिसरातील दगड कलर करणे कारंजे चालू करण्या संदर्भात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ च्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख यांना निवेदन देण्यात आले होते, त्याची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या सोबत मध्यवर्ती महामंडळ ची बैठक संपन्न झाली होती.





गुरुवार दि. 17 एप्रिल रोजी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात राजमुद्रा बसवणेची जागा पाहणी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज पुतळा कलर, दगड कलर आणि कारंजेची पाहणी ही केली. १४ मे च्या आत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा कलर होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची १० फुटी राजमुद्रा बसवण्यात येणार आहे. परिसरातील दगड कलर करण्यात येणार आहे व कारंजे ही चालू होणार असल्याची माहिती मध्यवर्ती महामंडळ संस्थापक अध्यक्ष राम जाधव यांनी दिली.






यावेळी राजाभाऊ गेजगे, हरिभाऊ सावंत, नागेश भोसले, सुमंत जगदाळे, सागर गायकवाड, अक्षय दोडमशी, अक्षय माळवदकर, कैलास डिगे, जानगवळी आदी उपस्थित होते.

Read More

वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे ईद-मिलनचा कार्यक्रम

April 17, 2025 0




          

सोलापूर - वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद आणि मालवाहतूक प्रदेशाध्यक्ष लाडजीभाई नदाफ उर्फ मुन्नाभाई यांच्यावतीने शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता गोल्डन हॉल मुळेगाव रोड या ठिकाणी ईद मिलन कार्यक्रम व वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

         




सोलापूरचे सर्व चालक मालक चालक प्रतिनिधी विविध प्रशासनिक अधिकारी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व महासंघाच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 

           





हा कार्यक्रम आपसी भाईचारा,सौहार्द आणि एकता वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित केला जात आहे. जो ईद-उल-फित्र च्या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने साजरा होणार आहे. वाहतूक संघटना संयुक्त महासंघ नेहमीच सामाजिक एकता आणि सांस्कृतिक समन्वयाला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे. हा ईद मिलनचा कार्यक्रम म्हणजे सर्व समुदायांना एकत्र आणून परस्पर प्रेम आणि आदर वाढविण्यासाठी छोटासा प्रयत्न आहे.

Read More

Wednesday, April 16, 2025

14 मे पूर्वी विविध कामे पूर्ण करा

April 16, 2025 0


         

सोलापूर - छत्रपती संभाजी महाराज यांची १४ मे ला जयंती असून जयंती च्या आत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा कलर करणे, राजमुद्रा बसवणे, दगड कलर करणे बाबत आमदार विजयकुमार देशमुख यांना निवेदन देण्यात आल होते, त्या अनुसंगाने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ यांची बैठक संपन्न झाली.





छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर सुशोभिरण करण्यास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांचा विशेष सहकार्य लाभल्या बद्दल त्यांचा मध्यवर्ती महामंडळ कडून विशेष सत्कार करण्यात आला.






या बैठकीत १४ मे च्या आत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा कलर करावे, छत्रपती संभाजी महाराज पुतळा समोरील आयलँड मधे संभाजी महाराज यांची १० फुटी राजमुद्रा बसवण्यात यावे व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील दगड कलर करणे आणि बंद असलेले कारंजे चालू करून घ्यावे यासंदर्भात सकारात्मक बैठक संपन्न झाली अशी माहिती मध्यवर्ती महामंडळ संस्थापकअध्यक्ष राम जाधव यांनी दिली.




यावेळी केसकर, पवन आलुरे, राजा गेजगे, हरि सावंत, नागेश भोसले, विरेश कलशेटी आदी जण उपस्थित होते.

Read More

Tuesday, April 15, 2025

भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूर चे कार्य कौतुकास्पद - रोहित टिळक

April 15, 2025 0



सोलापूर - भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूर यांच्या वतीने परशुराम प्रीमियर लीग 2025 चे आयोजन करण्यात आले होते यावेळी एकूण 16 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते यामध्ये 10 पुरुषाच्या 4 महिलाच्या व 2 पौरोहित्य करणाऱ्या गुरुजीचे असे संघ सहभागी झाले होते दिनांक 10 एप्रिल पासून ते 14 एप्रिल पर्यंत भंडारी ग्राउंड जुळे सोलापूर येथे हे सामाने पार पडले 





  

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य टिळकाचे वारासदार श्री रोहित टिळक हे उपस्थित होते,यावेळी बोलताना या भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूर च्या विविध उपक्रमाचे कौतुक करत तुमच्या पाठीशी ठाम पणे उभारणार असल्याचे अभिवचन दिले तसेच परशुराम जयंती निमित्त वेगवेगळ्या उपक्रम घेतल्याने त्याचेही कौतुक केले. 




ब्राम्हण समाजाचे नेते काकासाहेब कुलकर्णी यांनीही यावेळी आपलें मनोगत व्यक्त करत या समिती चे कार्य कौतुकास्पद असून  तरुणांना ह्यात जास्तीत  जास्त संधी द्यावी असे अहवान केले व  लोकोपयोगी कार्य करत जयंती साजरी करावी असे सांगत शुभेच्छा दिल्या. 

  




यावेळी रोहित टिळक यांचा हस्ते  क्रिकेट मधील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ऍड निशीकांत देगावकर टीमला 11 हजार रोख पारितोषिक व परशुराम ट्रॉफी  प्रसन्न वाघमारे व टीमला देण्यात आली द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 5 हजार रोख व परशुराम ट्रॉफी ऍड विनीत देशपांडे या टीमच्यावतीने गोविंद कुलकर्णी यांनी स्वीकारले,मॅन ऑफ दि सिरीज संकेत काकनगी यांना मिळाले.






यावेळी या कामिटींचे स्वागताध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी,महिला अध्यक्ष सायली जोशी, ऍड शर्वरी रानडे, ब्राह्मगर्जना प्रतिष्ठानचे प्रमुख विक्रम ढोनसळे, आय एम एस स्कुल चे प्रमुख श्री अमोल जोशी, अनिता कुलकर्णी, कपिल कुलकर्णी सोमपा परिवहन समिती चे माजी सभापती दैदिप्य वडापूरकर, रोहित तडवळकर, संदीप कुलकर्णी,  योगेंद्र पूजारी, वैभव पाटील, पंकज कुलकर्णी, क्रीडा संघटक रविंद्र नाशिककर,बालाजी पाठक, उन्मेष कुलकर्णी, वैभव दुसे, प्रसन्न वाघमारे, आप्पा रामदासी यांच्या सह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना जयतीर्थ पडगानूर तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऋतुजा लिमये यांनी केले.

Read More

Saturday, April 12, 2025

नामवंत वकिलांच्या स्मृती युवा वकिलांना मार्गदर्शक,स्पर्धेमुळे खिलाडूवृत्तीत वाढ

April 12, 2025 0

 




सोलापूर - रंगभवन येथे माजी जिल्हा सरकारी वकील श्री.संतोष न्हावकर यांच्या संकल्पनेतून विधीगंध संस्था व सोलापूर बार असोसिएशन कडून आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट चषक उदघाटन व नामवंत विधिज्ञाच्या स्मृतीप्रित्यर्थ विधीगंध पुरस्कार सोहळा पार पडला. त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत असताना नामवंत विधीज्ञाच्या स्मृती जागविल्याने युवा पिढीला प्रेरणा मिळते.वकीलानी क्रिकेट मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, वकील सहसा खेळामध्ये भाग घेत नाहीत , कनिष्ठ वकील व जेष्ठ वकील त्या निमित्ताने एकत्र येऊन खेळल्याने दोघां मध्ये खेळ भावना येण्यास मदत होते असे प्रतिपादन श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी केले.






विधीगंध चषक मध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकील संघ मिळून एकूण 20 संघ सहभागी झालेले आहे. या प्रसंगी क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन व  विधीगंध पुरस्काराचे  आयोजन करणेत आलेले होते.





याप्रसंगी  कै . तात्यासाहेब नेर्लेकर स्मृती विधीगंध पुरस्कार हा ॲड वसंतराव भादुले पंढरपूर यानां त्यांनी आपल्या वकीलपदाच्या कार्यकाळात दिवाणी व फौजदारी क्षेत्रात  भूमिका निभावल्या बद्दल देण्यात आला. तर कै ए. तू. माने यांच्या स्मृती प्रित्यर्थ विधीगंध पुरस्कार डी एन काळे माळशिरस यांना देण्यात आला. तर कै. ए. डी. ठोकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ऍड.बापू करंजकर यांना  आपल्या वकिलीत केलेल्या अतुलनीय कार्या बद्दल पुरस्कार श्री.सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.तसेच नूतन न्यायाधीश अनिता हवालदार व जेलर तसेच सर्व तालुका बारचे अध्यक्षांचा सत्कार मा. सुशीलकुमार शिंदे यांचे हस्ते करण्यात आला.






 नविन पिढीसमोर आदर्श निर्माण व्हावा म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ यांचा पुरस्कार सोहळा व खेळातून खिलाडूवृत्ती वाढावी यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले असे प्रतिपादन अँड. संतोष न्हावकर यांनी केले तसेच त्यांनी कै. अशोक ठोकडे व कै. तात्यासाहेब नेर्लेकर यांच्या विविध आठवणी सांगून स्मृती जागवल्या.





याप्रसंगी क्रिकेट स्पर्धेच्या टी शर्ट चे अनावरण करणेत आले व सुशीलकुमार शिंदे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पहिल्या सामन्याचा टॉस करून स्पर्धेचे  उदघाटन करण्यात आले.





 क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघास कै ॲड व्ही.डी फताटे iयांच्या स्मृती प्रित्यर्थ विजेता चषक देण्यात येणार असून, उपविजेता संघास कै ॲड जयकुमार काकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ उपविजेता चषक, तसेच मॅन ऑफ द सिरीज चषक कै ॲड आर. जी. देशपांडे यांचे स्मृती पित्यर्थ व बेस्ट बॅट्समन चषक कै ॲड जी. एस. आडम यांचे स्मृती प्रित्यर्थ प्रदान करण्यात येणार आहे तसेच उक्रूस्ट गोलंदाज चषक कै.ॲड रमेश कनबसकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रदान करण्यात येणार आहे.





या प्रसंगी व्यासपीठावर विधीगंध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड. संतोष न्हावकर, सुशीलकुमार शिंदे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. वी पी शिंदे, जेष्ठ वकील धनंजय उर्फ आबासाहेब माने, झहीर सगरी,मनोज पामुल, निदा सैफन, विनय कटारे हे उपस्थित होते सोबतच संपूर्ण जिल्हा तुन आलेले वकील खेळाडू, जेष्ठ व कनिष्ठ वकील बंधू भगिनी मोठ्या उपस्थित होते. 




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा गव्हाणे यांनी तर आभार ऍड. मंजुनाथ ककलमेली यांनी मानले.

Read More

Post Top Ad

Your Ad Spot