सोलापूर- महात्मा बसवेश्वर महामंडळ, विजापूर रोड आणि जागतिक लिंगायत महासभा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ओम गर्जना चौक,सवेरा नगर सैफुल येथे बसव जयंतीनिमित्त आयोजित एका विशेष व्याख्यान आणि जीवनगौरव -सन्मान समारंभाचे प्रथम श्रेणीचे सरकारी कंत्राटदार परमानंद अलगोंडा पाटील यांनी बसवण्णाच्या प्रतिमेला प्रार्थना करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. जागतिक लिंगायत महासभेचे राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
व्यासपीठावर माजी आमदार शिवशरण पाटील, डॉ. शरणबसव हिरेमठ, शिक्षक नेते सूर्यकांत भरले व वीरभद्र यादवाड , शासकीय कंत्राटदार रेवणसिद्ध बिज्जरगी, चन्नबसप्पा गुरुभेट्टी, जागतिक लिंगायत महासभाचे अध्यक्ष शिवानंद गोगाव ,माजी विस्तार शिक्षणधिकारी अशोक भांजे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण चलगेरी, नामदेव फुलारी, महिला अध्यक्षा राजेश्री थलंगे,आदी उपस्थित होते.
शंकरलिंग महिला मंडळ आणि जागतिक लिंगायत महासभेच्या महिला सदस्यांनी सादर केलेल्या 'अनुभव मंडपा'मधील अक्का महादेवी- अल्लमप्रभू यांच्या संवादाच्या १०० व्या रूपक प्रयोग ने लक्ष वेधून घेतले.माता अक्का महादेवी यांची भूमिका राजश्री थंळगे यांनी साकारली. महानयोगी अल्लमप्रभू, शिवयोगी सिद्धारमेश्वर ची भूमिकासह 40 महिला कलाकारांनी ने अप्रतिम अभिनय सादर केले. व उपस्थिताचे मने जिकंली.
व्याख्यानाचे पहिले पुष्प 'बसवण्णांच्या विचारांमधून सामाजिक एकता' या विषयावर व्याख्यान गुमफतांना आज सर्वत्र अशांतता आहे. घरे आणि मनं दुःखाची कुंडं बनत चालली आहेत. मुले संस्कृतीपासून दूर जात आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकाने आपल्या जीवनात शरण संस्कृती अंगीकारण्याची गरज आहे. त्यामुळे आजच्या मुलांना बसवण्णा आणि शरणं यांचे वचन व त्यांचा अर्थ शिकवला तर ते आयुष्यात कधीही भरकटणार नाहीत, असे लातूरचे डॉ. भीमराव पाटील यांनी सांगितले. आजची मुले आणि तरुण शहाणे आहेत. ते म्हणाले की, ते शिक्षणाचे कोणतेही क्षेत्र असो, ते वैद्यकीय असो किंवा अभियांत्रिकी, जर त्यांना व्यावसायिक शिक्षणासोबतच शरणची तत्वे आणि वचने शिकवले तर ते आयुष्यात यशस्वी होतील.
दुसरे पुष्प व्याख्याते डॉ. बी. बी. पुजारी यांनी "सांस्कृतिक नायक बसवण्णा" यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, बसवण्णा हे जगातील एक महान तत्वज्ञानी होते. ते फक्त एका राज्याचे सांस्कृतिक नायक नाहीत. संपूर्ण विश्वाचे नायक आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार समजून घेणे आणि ते आज आपल्या जीवनात लागू करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमास दासोह केलेले बसवेश्वर हॉटेलचे मालक चन्नाबसप्पा गुरुभेट्टी आणि जयश्री गुरुभेट्टी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खसगी, सचिव नागेंद्र कोगनुरे, युवक अध्यक्ष शिवराज कोटगी, अक्कलकोट तालुकाध्यक्ष सचिन कालीबत्ती, सोलापूर अध्यक्ष डॉ.बसवराज नांदर्गी, शशिकला रामपुरे, उ.सोलापूर अध्यक्ष उमेश कल्याणी, वागदरी अध्यक्ष शरणप्पा मंगाणे , बसवराज आलुरे आदी उपस्थितीत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र हौदे, राजशेखर लोकापुरे आदींनी परिश्रम घेतले. मीनाक्षी बागलकोट आणि मीनाक्षी थलंगे वचन गायले. अध्यक्ष शिवानंद गोगाव यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रास्ताविक केले. शिक्षक सुरेश पीरगोंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. तर रमेश येणेगुरे आभार मानले.
या मान्यवरांचे जीवन गौरव सत्कार
सिद्धराम गुरुभेट्टी, परमानंद अलगोंडा, शिवानंद भरले, अमर पाटील, काशिनाथ भतकुनकी, तुकाराम कुदळे, शिवलीला गुड्डोदगी, इंदुमती हिरेमठ, भाग्यश्री सोडगी, गुरुबाळ बगले, संतोष हरकरे. मान्यवरांनी त्यांना बसवांची मूर्ती आणि विभूती भेट देऊन त्यांचा सन्मान केला.