Swarajya News Marathi : पत्रकार परिषद

Youtube Subscribe

ads

Hot

Post Top Ad

Your Ad Spot
Showing posts with label पत्रकार परिषद. Show all posts
Showing posts with label पत्रकार परिषद. Show all posts

Wednesday, April 30, 2025

सोलापुरात राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन... श्रीलंकेचे भंते यांच्या हस्ते होणार उद्घाटन

April 30, 2025 0

 

 



सोलापूर : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने क्रांतीप्रवण झालेल्या सोलापूर नगरीत शनिवार दि. 3 मे 2025 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हुतात्मा स्मृती मंदिरात( लुम्बीनी नगरीत) राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये भंते यश यांची धम्मदेसना, डॉ. भीमराव आंबेडकर यांचे मार्गदर्शन आणि विविध परिसंवादातून धम्म विचारांचा जागर होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

           




बौद्ध साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित या संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी 10 वाजता श्रीलंकेचे भंते यश यांच्या हस्ते  होणार आहे. यावेळी भंते यश यांची धम्मदेसना होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी शिक्षणाधिकारी योगीराज वाघमारे हे या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.यावेळी  संमेलनाचे अध्यक्ष वाघमारे यांचे अध्यक्षीय भाषण होईल. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक धर्मादाय आयुक्त संजय पाईकराव , पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे , जि.प.पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी,  जि.प.सोलापूर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख , कुर्डूवाडी नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी शाहू सतपाल आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. 

          





दुपारी 1 वाजता  पहिल्या परिसंवादात " धर्मांतरोत्तर सामाजिक पुनर्बांधणीसाठी आंबेडकरी प्रेरणेच्या साहित्यिकांची भूमिका कितपत पोषक " या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून  प्रा. डॉ. आनंद देवडेकर (मुंबई ) तर  प्रा.डॉ. सारीपुत्र तुपेरे (सोलापूर) प्रा. डॉ. एम. डी. शिंदे (सोलापूर) या वक्त्यांचा सहभाग राहणार आहे. दुपारी 2 ते 2.30 दरम्यान सर्वांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.

        




दुपारी 2.30 वाजता दुसरा परिसंवाद होणार असून यामध्ये "बौद्ध धम्माची आधुनिक काळात गरज"या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजय मोहिते  हे विचार मांडणार आहेत. यामध्ये प्रा. डॉ. संघप्रकाश दुड्डे  (सोलापूर), उपप्राचार्य प्रकाश शिंदे या मान्यवरांचा सहभाग राहणार आहे.




दुपारी 3.30 वाजता  होणाऱ्या तिसऱ्या परिसंवादात "मराठी भाषेत बौद्ध साहित्य निर्मिती- काल - आज - उद्या " या विषयावर प्रमुख वक्ते  म्हणून ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड (सोलापूर) तर साहित्यिक प्रा. डॉ. धम्मपाल माशाळकर (सोलापूर), पत्रकार, लेखक दत्ता थोरे हे विचार मांडतील.






सायंकाळी 4.30 वाजता "धम्म चळवळीत महिलांचे योगदान "या विषयावर चौथा परिसंवाद होणार आहे. यामध्ये प्रमुख वक्त्या प्रा. रेखा मेश्राम (छत्रपती संभाजीनगर) , प्रा. डॉ. अंजना गायकवाड(सोलापूर), प्रा. अहिल्या गायकवाड-कांबळे (सोलापूर), शारदा गजभिये (सोलापूर), धम्मरक्षिता कांबळे (सोलापूर) या विचार मांडणार आहेत.

        




दरम्यान, सायंकाळी 5.30 वाजता होणाऱ्या पाचव्या परिसंवादात " पाली भाषेतील बौद्ध साहित्य " या विषयावर प्रमुख वक्ते तथा पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पाली भाषा विभाग प्रमुख प्रा.डॉ.विजयकुमार झुंबरे आणि डॉ. औदुंबर मस्के (सोलापूर),  प्रा. डॉ. देविदास गायकवाड(सोलापूर), डॉ. सुभाष कांबळे (सोलापूर) आदी विचार मांडणार आहेत.

        




सायंकाळी 7 वाजता समारोप सत्रात प्रमुख अतिथी म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर (मुंबई )हे मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी रिपाइं(ए) चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री राजाभाऊ सरवदे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे , ज्येष्ठ नेते सुभानजी बनसोडे , भीमशक्ती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुबोध वाघमोडे, रिपाइंचे ज्येष्ठ नेतेे के. डी. कांबळे, बसपाचे प्रदेश महासचिव अ‍ॅड. संजीव सदाफुले , कामगार नेते अशोक जानराव, कामगार नेते जनार्दन शिंदे, माजी गटनेते आनंद चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध वाघमारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या संमेलनास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी केले आहे.

         



या पत्रकार परिषदेस कोषाध्यक्ष किरण बनसोडे , समन्वयक डॉ. सुरेश कोरे , कार्यवाह भालचंद्र साखरे, प्रा. वशिष्ठ सोनकांबळे , अण्णासाहेब वाघमारे आदींसह कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.






' मोहब्बत की किताब' नाटिकेद्वारे संविधान जागर !

दरम्यान, सायंकाळी 6.30 वाजता प्रबोधनात्मक नाटिका  ' मोहब्बत की किताब' नाटिकेद्वारे संविधान जागर होणार आहे.राज्यकर निरीक्षक अभियंता बुद्धजय भालशंकर लिखित आणि भागवत कुवळेकर दिग्दर्शित या भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करणार्‍या लघु नाटिकेचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये बुद्धजय भालशंकर, भागवत कुवळेकर, शशिकांत जाधव, सविता कुवळेकर यांची प्रमुख भूमिका राहणार आहे,असे समन्वयक डॉ. सुरेश कोरे यांनी सांगितले.







संमेलनाची ठळक वैशिष्ट्ये - 


 * संमेलन विचार मंचाला "सारनाथ" तर  ग्रंथदालनास "नालंदा" नाव

* एकूण 5 परिसंवाद तर एका लघुनाटिकेचा समावेश

* विविध महत्त्वपूर्ण विषयांवर 

  होणार ठराव मंजूर 

*  शाक्य संस्था, सिदनाक ब्रिगेड व समता सैनिक दल या तिन्ही दलाची एकसंघ सलामी   * स्फूर्तीदायी गीतांचा कार्यक्रम 

Read More

Monday, April 28, 2025

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाचा बुधवारी शुभारंभ

April 28, 2025 0

 



सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाचा बुधवारी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शुभारंभ होणार आहे. यानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.





या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लिमिटेड (नॅफकॅब) चे उपाध्यक्ष सी.ए. मिलिंद काळे, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी उपस्थित राहणार आहेत.







या कार्यक्रमास सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सर्व ग्राहक, सभासद, हितचिंतक बंधू भगिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी याप्रसंगी केले.







बँकेच्या हीरक महोत्सवानिमित्त वर्षभर सर्व शाखांच्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहक मेळावे, काही शाखांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, कर्मचाऱ्यांचे विविध गुणदर्शन, व्याख्याने, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, बँकांच्या संचालकांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा, परिसंवाद तसेच विद्यार्थ्यांसाठी माहितीपर व्याख्याने, माजी कर्मचारी आणि माजी संचालक यांचे एकत्रिकरण असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.







बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त बँकेच्या नवी पेठ शाखेत बुधवारी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या पूजेच्या तीर्थप्रसादासाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व ग्राहक, सभासद, हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सोलापूर जनता बँकेतर्फे करण्यात आले आहे.







या पत्रकार परिषदेस सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे, संचालक ॲड. प्रदीपसिंह राजपूत, तज्ञ संचालक सी. ए. गिरीष बोरगावकर, जगदीश भुतडा, मुकुंद कुलकर्णी, विनोद कुचेरिया, संचालिका चंद्रिका चौहान, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे, सरव्यवस्थापक प्रदीप बुट्टे, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, मकरंद जोशी, देवदत्त पटवर्धन, सहाय्यक सरव्यवस्थापक तुळशीदास गज्जम, मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे, सुहास कमलापूरकर, मल्लिनाथ खुने, सुधांशू रानडे, मुख्य कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Read More

Friday, April 18, 2025

आयपीएल फॅन पार्क सोलापुरात शासकीय मैदानावर... लकी ड्राद्वारे मिळणार टी शर्ट

April 18, 2025 0

 

 



सोलापूर - आयपीएलचा हंगामातील चार सामने पाहण्याचा लाभ सोलापूरकराना मिळणार असून शनिवारी व रविवारी नेहरूनगर शासकीय मैदानावर यासाठी १८ बाय ३२ फुटाची स्क्रीन लावण्यात आली आहे.





आयपीएल  फॅन पार्क सोलापुरात सातव्यांदा होत असल्याची माहिती बीसीसीआयचे प्रतिनिधी अमित सिद्धेश्वर यांनी दिली. मागील वर्षी  सोलापुरात झालेल्या आयपीएल फॅन  पार्क मध्ये 14 हजार प्रेक्षकानी हजेरी लावल्यामुळे यंदा परत सोलापूरला हा मान मिळाला आहे.  या फॅन पार्कमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. या फॅन पार्कमध्ये लहान मुलांसाठी आकर्षक गेम असून फूड स्टॉल ही आहेत.  प्रेक्षकातून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. चार सामन्यातून चार टी-शर्ट लकी ड्रॉ विजेत्यास मिळणार आहेत.  त्या टी-शर्ट वर आयपीएल मधील त्या खेळाडूची सही असणार आहे.





चारही सामने प्रेक्षकांना पाहण्यास निशुल्क असून प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सो  यांनी केले आहे. यावेळी जिल्हा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश भूतडा, खजिनदार संतोष बडवे, अप्पू गोटे, ऋत्विक चव्हाण व सुनील मालप आदी उपस्थित होते.





असे होणार सामने

शनिवार : गुजरात विरुद्ध दिल्ली

राजस्थान विरुद्ध लखनऊ

रविवार : पंजाब विरुद्ध बंगलुरु

मुंबई विरुद्ध चेन्नई

Read More

Friday, April 11, 2025

12 ते 14 एप्रिल दरम्यान विधीगंध चषक क्रिकेट स्पर्धा तर विधीगंध स्मृती पुरस्काराचे वितरण

April 11, 2025 0

 



सोलापूर - विधीगंध सेवा संस्था आणि सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही वकीलांच्यासाठी विधीगंध टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दि. 12 ते 14 एप्रिल या दरम्यान आयोजित करण्यात आले तसेच आपल्या वकीली क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या तीन ज्येष्ठ वकीलांना पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती विधीगंध सेवा संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष न्हावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    





सोलापूरच्या नेहरू नगर शासकीय मैदानावर दि. 12 एप्रिल पासून ते 14 एप्रिल पर्यत वकीलांच्या विधीगंध चषक स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये एकूण वकीलांचे 25 संघ सहभागी होणार आहेत. 10 षटकांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.वकीलांमध्ये सांघिक भावना वाढावी या हेतुने ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 






तसेच वकील क्षेत्रात आपली उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ विधिज्ञांच्या नावाने तीन ज्येष्ठ वकीलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्वर्गिय भास्कर ऊर्फ तात्यासाहेब नेर्लेकर स्मृती विधीगंध पुरस्काराने अ‍ॅड वसंतराव भगवान भादुले यांना तसेच स्वर्गिय आण्णासाहेब ऊर्फ ए.तु.माने स्मृती पुरस्कार अ‍ॅड दत्तात्रय नानासाहेब काळे यांना तर स्वर्गिय ए.डी.ठोकडे स्मृती विधीगंध पुरस्कार अ‍ॅड. पी.आर. बापुसाहेब करंजकर यांना देवून सन्मान करण्यात येणार आहे.






सोलापूरचे सुपुत्र देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम शनिवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता रंगभवन येथे होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला अ‍ॅड. जहिर सगरी, अ‍ॅड.शैलेश पोटफोडे, अ‍ॅड. सचिन साखरे, अ‍ॅड. योगेश कुरे आदी उपस्थित होते.

Read More

सोलापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी पुन्हा रणसिंग फुंकले

April 11, 2025 0





सोलापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापूर येथे व्हावे या मागणीसाठी विशेष बैठकीचे आयोजन गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी कर्णिक नगर येथे अस्मिता व्हीजन न्यूज चॅनल च्या कार्यालयात करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते राजु राठी होते सोलापूर जिल्ह्यातून मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्याची संख्या दरवर्षी ५००० अधिक  आहे अशा स्थितीत न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून पक्षकारांना न्याय जलद व स्वस्तात मिळवा , यासाठी सर्वसामान्य पक्षकांराचे हित लक्षात घेऊन सोलापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे गरजेचे आहे. बिहार सारख्या छोट्या राज्यात  सहा खंडपीठ आहेत मात्र तुलनेने भौगोलिक दृष्ट्या मोठ्या असणाऱ्या महाराष्ट्रात मात्र केवळ औरंगाबाद व नागपूर या दोन  ठिकाणीच खंडपीठ आहे महाराष्ट्र हा  लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे राज्य आहे तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून न्यायालयात दाद मागणार्याची  संख्या देखील मोठी आहे त्यामुळे राज्यातील सोलापूर सह प्रत्येक जिल्ह्यात  खंडपीठ व्हावे अशी आता जनतेतून मागणी होत आहे सोलापूर वकील संघाने यापूर्वी 14 फेब्रुवारी 1998 रोजी सर्वप्रथम ही मागणी  केली होती त्यानंतर सन 2013 -14 मध्ये 52 दिवसाचे आंदोलन देखील छेडले होते, शिवाय त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा देखील केला आहे  नुकतेच भारताचे केंद्रीय कायदामंत्री मेघवाल  हे सोलापूर दौऱ्यावर आले असता वकील संघाने तसेच स्थानिक व्यापारी व विविध सामाजिक संस्थांनी त्यांच्याकडे खंडपीठाच्या मागणीसाठी लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.आता पुन्हा या मागणी साठी  जोर धरला जात आहे .

      





पंढरपूर व सांगेला येथील काही वकीलांनी कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे या मागण्यासाठी नुकतीच पंढरपूर येथून रथयात्रा काढली व त्याला समर्थन  दिले होते. ही सोलापूरजिल्हाच्या हिताची दृष्टीने चिंतेची बाब आहे  यावर नाराजी व्यक्त करण्यात आली.यापुढे सोलापूर जिल्ह्यातील सर्वांनी एकसंध होऊन सोलापूरच्या विकासासाठी लढावे असा सूर देखील या बैठकीतून उमटला. प्रथमता संयोजन समितीचे वतीने ॲड.राजन दिक्षित यांनी सर्वांचे स्वागत केले.या बैठकीत ॲड .सुरेश गायकवाड ॲड. खतीब वकील अभियंता व कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले ,नोटरी असोसिएशन चे अध्यक्ष ॲड हेमंत कुमार माळी, ॲड.मल्लीनाथ पाटील, ॲड.केशव इंगळे, सोलापूर विकास मंच चे सदस्य विजय कुंदन जाधव जेष्ठ पत्रकार पांडुरंग सुरवसे जेष्ठ नागरिक संघटनेचे गुरूलिंग  कुरनुरकर सामाजिक कार्यकर्ते प्रा.केदारीनाथ सुरवसे आदींनी खंडपीठ का ? कशासाठी ? व्हावे, या मागणीसाठी पाठपुरावा कसा करायचा ?  यावर आपली व्यापक भुमिका मांडली. राजु राठी यांनी  मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ मागणी कृती समिती, सोलापूर जिल्हा याची घोषणा करून यासाठी कायद्याचे चाकोरीत राहून जन आंदोलन उभे करू असे सांगितले. येत्या १७ एप्रिल ला मा.जिल्हाधिकारी यांना सविस्तर निवेदन देण्याचेही ठरले. 





या बैठकीस ॲड.असिम बांगी, ॲड.सुनिल क्षीरसागर, ॲड.अभय बिराजदार, ॲड.पी.बी.गायकवाड, ॲड अविनाश कडलासकर, ॲड . राहुल गायकवाड ॲड, चॅदपाशा शेख, ॲड.एस.आर.रेशमे, ॲड.विलास भांबुरे, दत्तात्रय आंबुरे , आनंद पाटील, नागेश शिरूर, यल्लालिंग सोसायटीचे चेअरमन प्रभाकर यादगिरी, संतोष गद्दी आदींसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Read More

स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत सामुदायिक विवाह सोहळा...२० मे रोजी बांधल्या जाणार रेशीमगाठी

April 11, 2025 0

 


 


सोलापूर : स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीने पुढील महिन्यात मंगळवार २० मे रोजी मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन शेळगी येथे करण्यात येणार असल्याची माहिती सोमनाथ रगबले यांनी पत्रकार परिषदेत दिली.





या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वधू-वरांना  कपाट,मणी मंगळसूत्र,संसारोपयोगी  भांडे सेट,शालू,जोडवी,सफारी, चप्पल, बूट इतर आवश्यक वस्तू देण्यात येणार आहेत. यासह सहभागी वधू वरांकडील पाहुणे मंडळींसाठी भोजनाची सोय करण्यात येणार आहे.विवाह सोहळ्यानिमित्त सजविलेल्या बग्गीतून वधू - वरांची पारंपरिक वाद्याने मिरवणूक काढण्यात येणार आहे.




या विवाह सोहळ्यातील वधू - वरांना आशिर्वाद देण्यासाठी काशी जगद्गुरु श्री श्री श्री विश्वराध्य डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आणि शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 





गोरगरिबांचा विवाह सोहळा थाटात व्हावा, वधू-वरांच्या दोन्ही परिवाराला आर्थिक झळ बसू नये या उद्देशाने या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी मोतीबिंदू शिबिर राबून आजतागायत ५ हजारहून  अधिक रुग्णांचे शस्त्रक्रिया करण्यात आले आहे. तुळजापूर ला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रत्येक वर्षी मोफत औषध उपचार ची सोय करण्यात येत असते. होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले आहे.अशा समाजपयोगी आणि विधायक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येत असते. या विवाह सोहळ्यात ज्या वधूवरांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी १० मे पर्यंत आपली नावे राहुल शाबादे मो.९५९५५६५०५०, सोमनाथ मेंडके ९७६४९६५०००,सोमनाथ रगबले ९९२२०१८६४१, संजय कणके ९८२३३७६१७७,यांच्याकडे नोंदणी करावे असे आवाहन सोमनाथ रगबले यांनी यावेळी केले.




या पत्रकार परिषदेस संजय कणके, ज्ञानेश्वर कारभारी, वीरेश उंबरजे, शिवानंद पुजारी, सुभाष कलशेट्टी, राहुल शाबादे यांची उपस्थिती होती.

Read More

Saturday, April 5, 2025

सोलापुरात पक्ष्यांसाठी आज वाटली जाणार १००० जलपात्रे

April 05, 2025 0



 


सोलापूर : सोलापुरात पक्ष्यांसाठी *शनिवार दिनांक ५ एप्रिल रोजी चार हुतात्मा पुतळा चौक येथे सकाळी सात वाजल्यापासून पक्षांना पाणी ठेवण्यासाठी शहरवासीयांना एक हजार जलपात्र मोफत वाटली जाणार आहेत*. सोलापुरातील लिटल फ्लावर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या १९८८ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी अनोखा असा हा पक्ष्यांसाठी पाणपोई उपक्रम सुरू केला आहे. अहमदाबाद मधील अंकुर इंडस्ट्रीज च्या पुढाकाराने सोलापूरकरांना ही पक्षांसाठी मातीची भांडी दिली जाणार असल्याची माहिती जितेंद्र व्होरा यांनी पत्रकार परिषदेत दिली. 





सोलापूर जिल्ह्यात महाकाय असे उजनी धरण आहे. या ठिकाणी हजारो पक्षी शेकडो मैल प्रवास करून येतात. सोलापूर शहरातील हिप्परगा तलाव, छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर तलाव तसेच होटगी तलाव या ठिकाणी विविध प्रजातीचे पक्षी आढळतात. सोलापूरच्या आजूबाजूचे वातावरण पक्षांसाठी पोषक असल्यामुळे पक्षांचे सोलापूर हे माहेरघर आहे. 





लोकांमध्ये पक्षांविषयी प्रेम जागृत व्हावे, पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने पाणपोई हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूरचे तापमान उन्हाळ्यामध्ये सरासरी ४० अंशाच्या वरच राहते. त्यामुळे पक्षांना पाणी शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. आपल्या घराभोवती, गॅलरीमध्ये तसेच बागेत नैसर्गिक चिवचिवाट वाढावा, म्हणून पक्षांसाठी सर्वांनी पाणी ठेवावे म्हणून खास अहमदाबाद मध्ये बनवलेली ही मातीची भांडी शहरवासीयांना दिली जाणार आहेत. एकूण ५००० जलपात्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला असून शनिवारी यातील एक हजार जलपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. 






शनिवारी सकाळी सात वाजता या उपक्रमाचा शुभारंभ सोलापुरातील लोकप्रतिनिधी, तसेच विविध शासकीय अधिकारी आणि उद्योजक यांच्या हस्ते केला जाणार आहे. आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, खासदार प्रणिती शिंदे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनाही कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत निमंत्रण देण्यात आले आहे. 





त्यामुळे शहरवासीयांनी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून चार पुतळ्याजवळ येऊन पक्षांसाठीची ही जलपात्रे घेऊन जावीत. तसेच या भांड्यामध्ये पाणी पिताणाचे पक्षांचे फोटो आम्हाला पाठवावेत त्यातील उत्कृष्ट अशा तीन छायाचित्रांना आम्ही बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करु, अशी माहिती जितेंद्र व्होरा यांनी दिली. 





या पत्रकार परिषदेस द्वारका उपलप तसेच रमेश रापेल्ली हे उपस्थित होते.

Read More

Thursday, March 27, 2025

हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे रविवारी भव्य शोभायात्रा

March 27, 2025 0

 




सोलापूर : हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे रविवार दि. ३० मार्च रोजी  शहरात दोन ठिकाणी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे संस्थापक रंगनाथ बंग आणि उत्सव समितीचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले.





बाळीवेस शोभा यात्रापहिली शोभायात्रा बाळीवेस येथील विजयी चौकातून दुपारी ४.३० वाजता प्रारंभ होणार आहे. या शोभायात्रेत विशेष सजीव देखावा, भारतमाता प्रतिमा, एलईडीवर प्रयागराज महाकुंभ, श्री अयोध्या मंदीर, श्री मथुरा मंदिर आणि श्री काशी विश्‍वेश्‍वर मंदीर चित्रफीत दाखविली जाणार आहे. छत्रपति श्री शिवाजी महाराज, बाल श्री संभाजी महाराज आणि मावळे असा सजीव देखावा असणार आहे. देवतांची वेशभूषा केलेली आणि सजवलेल्या बग्गीत बसलेली मुले असणार आहेत. महिला सक्षमीकरणासाठी लाठी काठी प्रदर्शन, काटवे यांचे भरतनाट्यम  सादर करण्यात येणार आहे. स्वामी यांचे रूद्र पठण, मारवाडी महिला मंडळ, पद्मशाली महिला मंडळ, पंचमुखी हनुमान मंदीर मुर्ती देखावा, आजोबा गणपती यांचे १०० जणांचे ढोल पथकही सहभागी होणार आहे. तसेच आकर्षक रांगोळीने सजावट केली जाणार आहे. 







नववर्ष स्वागत शोभा यात्रेत अयोध्या येथील रामलल्लाचे दर्शनदा यंदाच्या च्या शोभायात्रेत सोलापूरकरांसाठी श्री अयोध्या येथील रामलल्ला मूर्तीचेही दर्शन होणार आहे.  तसेच भारतमाता रथ आदींचा समावेश असणार आहे. ही शोभायात्रा बाळीवेस चौकातून प्रारंभ होऊन टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, दत्त चौक, नवीपेठ, पारसइस्टेटमार्गे शिवस्मारक पटांगणात  विसर्जित होईल.





 जुळे सोलापूर शोभायात्रा दुसरी शोभायात्रा जुळे सोलापूर परिसरातून काढण्यात येणार आहे. दुपारी ४.३० वाजता ही शोभायात्रा किल्लेदार मंगल कार्यालय येथून प्रारंभ होणार असून केएलई शाळेजवळ येथे  समारोप होईल. दरवर्षीप्रमाणे हिंदू नववर्ष शोभायात्रेत हिंदू बंधू - भगिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन रंगनाथ बंग यांनी केले.






या पत्रकार परिषदेस उत्सव समिती अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, संस्थापक अध्यक्ष रंगनाथ बंग, कोषाध्यक्ष नितीन करवा, सचिव ज्ञानेश्‍वर म्याकल, प्रकाश कलकोटे, बाळीवेस शोभायात्रा प्रमुख चिदानंद मुस्तारे, जुळे सोलापूर शोभायात्रा प्रमुख जयदेव सुरवसे, महिला सांस्कृतिक प्रमुख ॲड. शर्वरी रानडे,

रविंद्र नाशिककर उपस्थित होते.

Read More

Post Top Ad

Your Ad Spot